Posts

Showing posts from September, 2015

सण, समाज आणि पर्यावरण

श्रावण महिना संपला की गणपतीचे वेध लागतात. गणपतीनंतर पितृपक्ष होतो की पाठोपाठ नवरात्र, दसरा, दिवाळी; त्यानंतर काही काळातच मकरसंक्रांत; त्या आधी नवे वर्ष म्हणजे गुढीपाडवा नव्हे; तर ३१ डिसेंबर. मग गुढीपाडवा, होळी वगैरे. वर्षभर साजरीकरणाची काही ना काही निमित्त सुरु असतात. भारतातील वेगवेगळ्या जातिधर्मांचे वेगवेगळे सण. सणांचे महत्त्वही वेगवेगळ्या ठिकाणी कमीजास्त असते; किंबहुना ‘होते’ असे म्हणू. गेल्या काही वर्षांत सण साजरा करण्यामध्ये स्थानानुसार, जातिधर्मानुसार असलेले फरक नाहीसे होऊ लागले आहेत. उदाहरणार्थ भावाबहिणीचा सण म्हणून महाराष्ट्रात भाऊबीजेला महत्त्व होते, रक्षाबंधनाचे महत्त्व उत्तर भारतात अधिक. मात्र, हल्ली सरसकट सर्वत्र राखीपौर्णिमा साजरी केली जाते आणि भाऊबीजसुद्धा सारख्याच उत्साहाने सर्वत्र साजरी केली जाते. प्रादेशिक सणांमध्ये पाश्चात्य साजरीकरणांचीही भर पडली आहे, त्यामुळे ३१ डिसेंबर सर्व आर्थिक स्तरांमध्ये, सर्व वयोगटात साजरा होताना दिसतो. खेरीज, मदर्स डे, फादर्स डे इत्यादी असतातच. तेवढीच साजरीकरणाला आणखी काही निमित्त, असा विचार तरुण पिढी करताना दिसते. एकूणात सणसमारंभांचे प्र